मोक्ष कसा मिळेल?

एकदा एका भक्ताने महाराजांना विचारले.

“या जन्म आणि मरणाच्या भानगडीतुन सुटण्यासाठी उपाय कोणता ते कृपा करुन महाराज सांगाल का?”

महाराज म्हणाले, “या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हा मनुष्य देह असतानाच सर्व वासनांचा त्याग करण्यास शिकले पाहिजे. जेव्हा या जन्मी मनुष्य सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच तो जन्ममरणाच्या चक्रातून – रहाटगाडग्यातून सुटतो आणि त्याला मोक्ष मिळतो.”

Leave a Reply

Your email address will not be published.