महाराजांचा कृपाप्रसाद मिळाला तो जगी धन्य झाला

महाराजांचा कृपाप्रसाद ज्या भक्तांना मिळाला ते जीवनात धन्य झाले. जे रंजले गांजले होते त्यांना सुखाचे दिवस आले. ज्यांना महाभयानक आजरपिडा होती ती त्याची दूर झाली. कोर्टाच्या कामाचा ज्यांच्या गळयाला फास होता तो सुटला. ज्यांना बैल गाडी नव्हती त्यांना ती मिळालीत. ज्यांना अन्न नव्हते ते सुखाने अन्न खाऊ लागले. ज्यांच्या अंगावर पुरेसे वस्त्र नव्हते त्यांना अंगभर वस्त्र मिळाले. ज्यांना झोपडी राहायला नव्हती त्यांना चांगले घर राहायला मिळाले. ज्यांना घरात नातवंडे खेळावीत अशी ज्यांची तीव्र इच्छा होती ती महाराजांच्या कृपेने पूर्ण झाली.

ज्यांना पंढरपूर बघण्याची इच्छा होती त्यांना दिंडीत नाचत नाचत पंढरपूर दाखविले. ज्यांना अध्यात्माची भूक होती ती त्यांनी मनसोक्त भागविली जे जे आपल्या भक्ताला अपेक्षीत होते ते ते त्यांनी दिले. भक्‍तांच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. मी भक्‍ताचा आणि भक्‍त माझा ही भावना त्यांनी अखेरपर्यंत जपली.

Leave a Reply

Your email address will not be published.