जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले

रामचंद्र पाटील एकदा महाराजांचे समवेत मठात बोलत बसले होते. अशा वेळी मठात एक संन्याशी आला. त्याच्या अंगावर भगवी वस्त्रे होती पण ती जीर्ण झाली होती. पार फाटली होती. महाराजांनी ही त्या संन्याशाची अवस्था बघताच त्यांनी त्याचे मनोगत जाणले आणि आपल्या अंगातील नवीन धोतर फाडून त्यातील निम्मे त्याच्या अंगावर घातले. संन्याशाला आनंद झाला. तो तेथून निघून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.