साक्षात महाराज अवतरले, पंढरीचे वारकरी वेळेत उठले

श्री क्षेत्र शिरगाव येथे, प. पू. बालदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळयासाठी दरवर्षीप्रमाणे ह.भ.प. दादा महाराज मनमाडकर व त्यांचे भजनी मंडळातील साथीदार आले होते. सर्व पंढरीचे वारकरी समाधी जवळच असलेल्या एका जनावरांच्या गोठयात झोपले होते. भजनी मंडळातील वैकुंठवाशी प. पू. नागनाथ महाराज माहूरगडकर आणि श्री. ह. भ. प. सूरदास रावसाहेब गव्हाणे हे दोघेही बैलांच्या गोठयात झोपले होते. झोपताना चर्चा झाली होती की काकडं आरतीला वेळेत उठून सूसज्ज व्हायचे. पण माळावर झुळझुळ वाहणारा वारा असल्यामुळे त्यांना गाढ झोप लागली. काकड आरतीला वेळेवर उठायचे असल्यामुळे त्यांना गाढ झोप नको होती. परंतू झुळझुळणाऱ्या वाऱ्यांनं त्यांना चांगलीच झोप लावली. हे सर्व वारकरी गाढ झोपेत आणि वेळेवर उठणार नाहीत याची जाणीव प. पू. बालदास महाराजांना झाल्यामुळे त्यांनी साक्षात या भजनी मंडळीला हाक मारली आणि म्हणाले, “अरे, पहाट झाली, पंढरीचे वारकरी उठा. काकड आरतीची वेळ झाली, आपल्या सेवेला प्रारंभ करा.”

सगळे वारकरी खाटकन उठले. तर महाराज पायात खडवा घालून खाडखाड आवाज करीत चालत होते. खडावांचा आवाज त्यांच्या कानात घुमत होता आणि त्यांनी मारलेली हाक ही त्यांच्या कानात घुमत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.